Home Blog Page 13

Kar Darshan Mantra

0

Kar Darshan Mantra in Marathi

कर दर्शन ( सकाळी उठल्यावर पहिल्यांदा स्वतःच्या तळहाताचे दर्शन घ्यावें व हा श्लोक म्हणावा )

Kar Darshan Mantra in Marathi
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ॥
करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम् ॥ १ ॥

Kar Darshan Mantra in English
|| karaagre vasate lakshmii karamadhye sarasvatii ||
|| karamuule tu govindaH prabhaate karadarshanaM ||

Shri Ram Stuti in Marathi

1

Shri Ram Stuti in Marathi

श्रीरामस्तुति

संसारसंगे बहु शीणलो मी | कृपा करी रे रघुराजस्वामी | प्रारब्ध माझे सहसा टळेना | तुजवीण रामा मज कंठवेना || १ ||

मन हे विकारी स्थिरता न ये रे | त्याचेनि संगे भ्रमते भले रे | अपूर्व कार्या मन हे विटेना || तुजवीण रामा मज कंठवेना || २ ||

मायाप्रपंची बहु गुंतलो रे | विशाळ व्याधीमधें बांधलो रे | देहाभिमाने अति राहवेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ३ ||

दारिद्र्यदु:खे बहु कष्टलो मी | संसारमायेतचि गुंतलो मी | संचीत माझे मजला कळेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ४ ||

लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे | श्रीराम ध्याता मनि कष्ट मोठे | प्रपंचवार्ता वदता विटेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ५ ||

अहोरात्र धंदा करिता पुरेना | प्रारब्धयोगे मज राहवेना | भवदु:ख माझे कधीही टळेना | तुजवींण रामा मज कंठवेना || ६ ||

तीर्थासी जाता बहु दु:ख वाटे | विषयातरी राहुनी सौख्य वाटे | स्वहीत माझे मजला कळेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ७ ||

मी कोठुनी कोण आलो कसा हो | स्त्रीपुत्र-स्वप्नातची गुंतलो हो | ऐसे कळोनी मन हे विटेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ८ ||

असत्य व्याख्यानी मुकाच झालो | अदत्तदोषे दु:खी बुडालो| अपूर्व करणी कशी आठवेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ९ ||

आब्रम्हमूर्ती भज रामसिंधू | चैतन्य स्वामी निजदीनबंधू | अभ्यंतरी प्रेम मनी ठसेना | तुजवींण रामा मज कंठवेना || १० ||

विश्रांति देही अणुमात्र नाही | कुळाभिमाने पडलो प्रवाही | अशातुनी दूर कधी कळेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ११ ||

विषयी जनानी मज आळवीले | प्रपंचपाशातचि बुडवीले | स्वहीत माझे मजला दिसेना | तुजवींण रामा मज कंठवेना || १२ ||

नरदेहदोषा वर्णू किती रे | उच्चाट माझे मनि वाटती रे | लल्लाटरेषा कधि पालटेना | तुजवीण रामा मज कंठवेना || १३ ||

मजला अनाथा प्रभु तूचि दाता | मी मूढ़ की जाण असेची आता | दासा मनी आठव वीसरेना | तुजवीण रामा मज कंठवेणा || १४ ||

Maajhi Renuka Mauli Lyrics

Maajhi Renuka Mauli Lyrics in Marathi

माझी रेणुका माऊली

माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली ।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥

हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥

खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥

Mahalaxmi Vrat Puja Vidhi – Margashisha

0

Mahalaxmi vrat puja vidhi – Margashisha

महालक्ष्मी व्रत (Mahalaxmi Vrat)

अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुखसमाधान सतत रहावे, हा त्यामागील हेतू असतो.व्रत केल्याने उत्तमफलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करुन शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे.

शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रध्दा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

महालक्ष्मी व्रत – पूजेची मांडणी (Mahalaxmi Vrat Puja)

महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी?

  • घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी.
  • पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा.
  • चौरंगावर कोरे(नवीन कापड) अंथरावे.
  • कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालावी.
  • त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी.
  • विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
  • चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा.
  • घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये.
  • मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.
  • त्याचेवर शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.

अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी.

पूजा मांडल्यावर महालक्ष्मी व्रत कथा (Mahalaxmi Vrat Katha) वाचावी.  त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे. पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. तिला हळदी-कुंकू वहावे. नमस्कार करावा.

पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की, ‘माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील, तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे!’

महालक्ष्मी व्रत – नियम (Mahalaxmi Vrat Niyam)

गुरुवारी प्रात:काळी उठावे. अंघोळ करावी. शुध्द अंत:करणाने व सश्रध्द भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करुन, सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी-कधी आकस्मिक अडचण उद्भवते; अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा- आरती करुन घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास पक्त पूजा, आरती करावी. कहाणी स्वत: वाचावी अथवा ऎकावी. व्रताची पूजा व कहाणी ऎकण्यास शेजार्‍यांना निमंत्रण द्यावे.

सायंकाळी गाईची पूजा करावी. तिला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा, आरती करावी. कहाणी वाचावी. सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी-कुंकू द्यावे. एक-एक फळ व व्रताच्या कथेची एक-एक प्रत द्यावी. शक्य झाल्यास ब्राम्हणांना शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसर्‍या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरु करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. हमखास यश लाभते.

Margashirsha MahaLaxmi Guruvar Vrat Katha – Marathi

9

Margashirsha MahaLaxmi Guruvar Vrat Katha

श्रीमहालक्ष्मीची कहाणी

श्री गणेशाय नम: । श्री महालक्ष्मी देव्यै नम: । ॐ श्रीं क्लृं ओम धनद धनं देहिमाम्‌ ।
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्मादिपायच । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: ॥

मन लावून ऎकावी. ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणीद्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहोनी, श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो द्याळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. दास-दासींवर रागावली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी. ओळखते की नाही हे बघावं. राणी राजव्ड्यात सुखाने रहात होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शामबाला.

एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी ? दासी म्ह्णाली, “राणीसाहेब महालात आहेत ! सख्यांशी गप्पा मारताहेत ! त्यांना सागितलं तर माझ्यावर रागावतील. तुला गं त्या कश्या भेटणार ! काय तुझा हा अवतार ! तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उणं-दुणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना !” म्हातारी रागावली, मनोमन संतापली, “ तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली ! आज झालीय राणी. पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना ! मीच तिला व्रत सांगितलं देवीचं ! तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा ! पैशाची धुंदी आलीय ! गोरगरिबांची पर्वा नाही. थोर्‍या मोठ्यांच्या मुली. त्या झाल्या मैत्रिणी ! म्हातारी गरीब अन्‌ भिकारीण ! तिला कोण वचारतयं ! पण, याचं फळं तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी.” दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली,”ते व्रत मला सांगाल ! मी ते नेमानं करीन ! उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही.”त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली, तोच माडीवरुन राणीची कन्या शामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली,”आजी, रागावू नका. चुकली माझी आई ! तिच्या वतीनं मी ख्षामा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या ! म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्शाणभर त्या मुलीकडे पाहिलं, आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून
आली. दाराशी येते, तर म्हातारी दिसली !

राणी ओरडली,” ए थेरडे ! कशाला गं आलीस? जा इथून ! ऊठ म्हणतेय ना ! जातेस की नाही ? दुसरी घरं नाही दिसली तुला ?”

म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली ! दासीपण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरूवारी शामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.

सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर. त्याच्याशी शामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शामबालेला राजवैभव मिळालं. हा होता, लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखा-समाधानानं संसार सालू होता. भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरुन राजा-राणी कष्टाने दिवस काढत होते.

‘भद्रश्रवाला कन्येला भेटावसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासर्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले.

सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवर्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दु:ख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एकेक दिवस दु:खाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे, डोळे भरुन पहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरतचंद्रिका घरुन निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीय. नदीकिनारी बसलीय. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा.”

शामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शामबालानं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फूटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली: सोन्या-मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं.

दुपारची वेळ झाली. शामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, “शामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन !” शामा म्हणाली,”ठिक आहे. “मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शामबाला सोबत गेली.

चार दिवसांनी शामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता, त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, “माहेराहून काय आणलसं ?” शामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं ? मिठाचे खडे ! “अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस ? इथं मिळत नाही मीठ ?” “मीठ मिळतं ना ? पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ ! समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज…” शामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारांत गुंगला.

शामबाला म्हणाली,“हे मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे.” मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले.

भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं.

सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. “आज्ञा करावी महाराज” ते म्ह्णाले. “भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एकेक खडा ठेवा. शपथ घेवून प्रत्येकाला झुंजायला सांगा.” राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेवून बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपुर्व विजय मिळविला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं.

मालाधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरुन मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायाला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार ! शामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप-दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं.

मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे सात पुत्र दुर देशाहून अचानक परत आले. त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला.

या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण . सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित रहावे अशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करावी.

Read full Guruvar Vrat Puja vidhi

Sundar te Dhyan in Marathi | सुंदर ते ध्यान

2

Sundar te Dhyan Sant Tukaram Abhang in Marathi

सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी
कर कटावरी ठेवोनिया

तुळसी हार गळा, कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रुप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने

भावार्थ:

विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचे हार असून कमरेभोवती पीतांबर आहे. विठ्ठलाचे हे रूपच मला नेहमी आवडते. त्याच्या कानांत मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभरत्‍न शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे मोहक मुखकमल हेच माझे सर्व सुख आहे. ते मी नेहमी आवडीने पाहीन.

Narak Chaturdashi Story in Hindi

0

Narak Chaturdashi Story

नरक चतुर्दशी का त्योहार हर साल कार्तिक कृष्ण चतुदर्शी को यानी दीपावली के एक दिन पहले मनाया जाता है। इस चतुर्दशी तिथि को छोटी दीपावाली के नाम से भी जाना जाता है। इस दिन प्रातः काल स्नान करके यम तर्पण एवं शाम के समय दीप दान का बड़ा महत्व है।

पुराणों की कथा के अनुसार भगवान श्री कृष्ण ने कार्तिक कृष्ण चतुर्दशी तिथि को नरकासुर नाम के असुर का वध किया। नरकासुर ने 16 हजार कन्याओं को बंदी बना रखा था।
नरकासुर का वध करके श्री कृष्ण ने कन्याओं को बंधन मुक्त करवाया। इन कन्याओं ने श्री कृष्ण से कहा कि समाज उन्हें स्वीकार नहीं करेगा अतः आप ही कोई उपाय करें। समाज में इन कन्याओं को सम्मान दिलाने के लिए सत्यभामा के सहयोग से श्री कृष्ण ने इन सभी कन्याओं से विवाह कर लिया।

मरते समय नरकासुरने भगवान श्रीकृष्णसे वर मांगा, कि ‘आजके दिन मंगलस्नान करनेवाला नरककी यातनाओंसे बच जाए ।’ तदनुसार भगवान श्रीकृष्णने उसे वर दिया । इसलिए इस दिन सूर्योदयसे पूर्व अभ्यंगस्नान करनेकी प्रथा है । भगवान श्रीकृष्ण द्वारा नरकासुरको दिए गए वरके अनुसार इस दिन सूर्योदयसे पूर्व जो अभ्यंगस्नान करता है, उसे नरकयातना नहीं भुगतनी पडती ।

दूसरी प्रचलित कथा
एक प्रतापी राजा थे जिनका नाम रन्ति देव था | स्वभाव से बहुत ही शांत एवम पुण्य आत्मा, इन्होने कभी भी गलती से भी किसी का अहित नहीं किया | इनकी मृत्यु का समय आया यम दूत इनके पास आये | तब इन्हें पता चला कि इन्हें मोक्ष नहीं बल्कि नरक मिला हैं | तब उन्होंने पूछा कि जब मैंने कोई पाप नहीं किया तो मुझे नरक क्यूँ भोगना पड़ रहा हैं | उन्होंने यमदूतों से इसका कारण पूछा तब उन्होंने बताया एक बार अज्ञानवश आपके द्वार से एक ब्राह्मण भूखा चला गया था | उसी के कारण आपका नरक योग हैं | तब राजा रन्ति से हाथ जोड़कर यमराज से कुछ समय देने को कहा ताकि वे अपनी करनी सुधार सके | उनके अच्छे आचरण के कारण उन्हें यह मौका दिया गया | तब राजा रन्ति ने अपने गुरु से सारी बात कही और उपाय बताने का आग्रह किया | तब गुरु ने उन्हें सलाह दी कि वे हजार ब्राह्मणों को भोज कराये और उनसे क्षमा मांगे | रन्ति देव ने यही किया | उनके कार्य से सभी ब्राह्मण प्रसन्न हुए और उनके आशीर्वाद के फल से रन्ति देव को मोक्ष मिला | वह दिन कार्तिक मास कृष्ण पक्ष की चौदस का था इसलिए इस दिन को नरक निवारण चतुर्दशी (Narak Chaturdashi) कहा जाता हैं |

Dhanteras Puja Vidhi Mantra

0

Dhanteras Puja Vidhi Mantra

Dhanteras is the first day of the five-day Diwali Festival as celebrated primarily in Northern & Western part of India. The festival, known as “Dhanatrayodashi” or “Dhanvantari Trayodashi”.The word Dhana means wealth and Trayodashi means 13th day as per Hindu calendar. It is celebrated on the thirteenth lunar day of Krishna paksha (dark fortnight) in the Hindu calendar month of Kartik.

This year Dhanteras is on 25th October 2019. Dhanteras is also known as Dhantrayodashi Puja and it is believed that during Dhantrayodashi, Goddess Lakshmi along with Lord Kuber (the god of wealth) came out of the milky cosmic sea to bless everyone with wealth, prosperity and good fortunes. Some people in India celebrate Dhantrayodashi as Dhanwantari Trayodasi as the birth anniversary of Dhanwantari (The God of Ayurveda.)

धनत्रयोदशी – Dhanteras Yamdeep daan Mantra
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन च मया सह।
त्रयोदश्यां दीपदानात सूर्यज: प्रीयतामिति॥

इस मंत्र का अर्थ है: त्रयोदशी को दीपदान करने से मृत्यु, पाश, दण्ड, काल और लक्ष्मी के साथ सूर्यनन्दन यम प्रसन्न हों। इस मंत्र के द्वारा लक्ष्मी जी भी प्रसन्न होती हैं।

Dhanteras Kuber Mantra
धनदाय नमस्तुभ्यम निधिपद्माधिवाय च I
भवन्तु त्वत्प्रसादान्मे धन धन्यदिसेम्पध II

Dhanteras katha in Hindi

0

धनतेरह कथा (Dhanteras katha in Hindi)

धनतेरस की शाम घर के बाहर मुख्य द्वार पर और आंगन में दीप जलाने की प्रथा भी है. इस प्रथा के पीछे एक लोक कथा है, कथा के अनुसार किसी समय में एक राजा थे जिनका नाम हेम था. दैव कृपा से उन्हें पुत्र रत्न की प्राप्ति हुई. ज्योंतिषियों ने जब बालक की कुण्डली बनाई तो पता चला कि बालक का विवाह जिस दिन होगा उसके ठीक चार दिन के बाद वह मृत्यु को प्राप्त होगा. राज इस बात को जानकर बहुत दुखी हुआ और राजकुमार को ऐसी जगह पर भेज दिया जहां किसी स्त्री की परछाई भी न पड़े. दैवयोग से एक दिन एक राजकुमारी उधर से गुजरी और दोनों एक दूसरे को देखकर मोहित हो गये और उन्होंने गन्धर्व विवाह कर लिया.

विवाह के पश्चात विधि का विधान सामने आया और विवाह के चार दिन बाद यमदूत उस राजकुमार के प्राण लेने आ पहुंचे. जब यमदूत राजकुमार प्राण ले जा रहे थे उस वक्त नवविवाहिता उसकी पत्नी का विलाप सुनकर उनका हृदय भी द्रवित हो उठा परंतु विधि के अनुसार उन्हें अपना कार्य करना पड़ा. यमराज को जब यमदूत यह कह रहे थे उसी वक्त उनमें से एक ने यमदेवता से विनती की हे यमराज क्या कोई ऐसा उपाय नहीं है जिससे मनुष्य अकाल मृत्यु के लेख से मुक्त हो जाए. दूत के इस प्रकार अनुरोध करने से यमदेवता बोले हे दूत अकाल मृत्यु तो कर्म की गति है इससे मुक्ति का एक आसान तरीका मैं तुम्हें बताता हूं सो सुनो. कार्तिक कृष्ण पक्ष की रात जो प्राणी मेरे नाम से पूजन करके दीप माला दक्षिण दिशा की ओर भेट करता है उसे अकाल मृत्यु का भय नहीं रहता है. यही कारण है कि लोग इस दिन घर से बाहर दक्षिण दिशा की ओर दीप जलाकर रखते हैं.

यम-दीपदान (Skandpuran) Yama Deep Daan Mantra
कार्तिक कृष्ण त्रयोदशीको सायंकाल समय किसी पात्रामें मिट्टीके दीपक रखकर उन्हें तिलके तेलसे पूर्ण करे । उनमें नवीन रुईकी बत्ती रखे और उनको प्रकाशित करके गन्धादिसे पूजन करे। फिर दक्षिण दिशाकी ओर मुँह करके

‘मृत्युना दण्डपाशाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात्‌ सूर्यजः प्रीयतां मम ॥’

Diwali – The Festival of lights

1

Diwali is just a few days away so get the best out of the festive season and enjoy this time of the year. People in India become joyous and happy and celebrate this festival with great gusto and pomp.

Diwali comes from the world Deepawali which also means Row of Lights. So the festival of Diwali is also called the Festival of Lights Diwali is the other name for this festival of lights in the northern part of India. In South India, the festival is called Deepavali.

Diwali is a five-day festival that is spread over five days. The first day is Dhanteras when everyone invokes the blessings of Goddess Lakshmi for success and prosperity besides wealth. Choti Diwali is the second day and this is also called Small Diwali or Naraka Chaturdashi in many states. it is known as Kali Chaudas in some states. Legend has it that Narakasura was an evil demon who was killed on this day. People thus worship Lord Rama and Goddess Lakshmi on this day. the third day is the main day of Diwali. This is the day when the devotees visit temples and worship and pray for success and prosperity in life. Lord Ganesha is also invoked on this day and everyone prays for successful endeavors thus removing all obstacles. An aarti is performed with oil lamps, cotton wicks and songs sung in praise of the goddess. All Indian houses have a lot of oil lamps and diyas all around the house during Diwali. Diwali is also the time when one sees a lot of colourful lanterns hung outside the front doors of all houses. Thus, it is an air of festivity all around and there is only celebration all over. Firecrackers are burst by all, and everyone likes to see the display of fireworks.
Padwa is the fourth day and is known by the name of Annakoot or Govardhan Puja. Legend has it that Lord Krishna defeated the God of Rain and heavens Lord Indra on this day. It is said that Lord Krishna lifted Mount Govardhana on this day and thus saved everyone from getting affected by the floods. People thus cook a lot of food on this day. There is another legend that the demon king Bali was defeated by Lord Vishnu on this day.

Then we have Bhaiduj which is the fifth and the last day and is also called Bhai dooj. This is known by the other name of Yama Dwitiya. This is the day when sisters and brothers meet each other to strengthen the relations. It is said that Yami was the sister of the god of Death Lord Yama. Sisters pray for the well being of the brothers on this day.

Diwali takes us from darkness to light and this is a light that gives us the power to commit ourselves to good actions and deeds. Diwali brings you closer to divinity. Lights illuminate all corners of the cities and Diwali is thus filled with a lot of hope, togetherness and joy.
Celebrate Diwali this year and enjoy this festival with a lot of festivity and happiness.